Ad will apear here
Next
एक संन्यासी
शिवाजी महाराजांचे चरित्र वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येते. दर वेळी त्यातून काही नवे होती लागते. निष्काम कर्मयोग हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. याची ओळख प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. लाखो लोकांचा संसार करणारे ते संन्यासी होते, असे जाधव सांगतात. महाराजांनी संपत्ती जमवली; मात्र त्या संपत्तीचा वापर केला तो रयतेच्या कल्याणासाठी.

श्रीमंती ही तिजोरीतील पैशावरून मोजता येत नाही, तर ती किती माणसे जोडली, त्यावरून मोजता येते. महाराजांच्या मोहिमा, मावळ्यांशी संबंध ठेवताना त्यांनी केलेला मानसशास्त्राचा वापर, याविषयी ते माहिती देतात. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमुळे आज महाराष्ट्राचे पर्यटनक्षेत्र समृद्ध झाले आहे, याचा अर्थ त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग येणाऱ्या सर्व पिढ्यांना झाला. त्यामुळे महाराजांचा विचार हा वर्तमानकाळाचा व भविष्यकाळाचाही आहे.

प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : १६०  
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZWSBQ
Similar Posts
रिच मदर रिच सन मुल गरिबीत जन्माला आले, तरी त्याने मोठेपणी चांगले पैसे कमवावे, असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्यासाठीची तयारी बालपणापासून करणे कसे आवश्यक आहे, हे प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘रिच मदर रिच सन’मधून शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्या माध्यमातून सांगितले आहे.
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू श्रीकृष्णाच्या चातुर्यापासून ते त्याच्या महान तत्त्वज्ञानापर्यंत अनेक गुणांची आपल्याला ओळख आहे; मात्र तो एक कुशल व्यवस्थापक होता, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘श्रीकृष्ण एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मुलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशलव्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व
गनिमी कावा शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language