शिवाजी महाराजांचे चरित्र वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येते. दर वेळी त्यातून काही नवे होती लागते. निष्काम कर्मयोग हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. याची ओळख प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. लाखो लोकांचा संसार करणारे ते संन्यासी होते, असे जाधव सांगतात. महाराजांनी संपत्ती जमवली; मात्र त्या संपत्तीचा वापर केला तो रयतेच्या कल्याणासाठी.
श्रीमंती ही तिजोरीतील पैशावरून मोजता येत नाही, तर ती किती माणसे जोडली, त्यावरून मोजता येते. महाराजांच्या मोहिमा, मावळ्यांशी संबंध ठेवताना त्यांनी केलेला मानसशास्त्राचा वापर, याविषयी ते माहिती देतात. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमुळे आज महाराष्ट्राचे पर्यटनक्षेत्र समृद्ध झाले आहे, याचा अर्थ त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग येणाऱ्या सर्व पिढ्यांना झाला. त्यामुळे महाराजांचा विचार हा वर्तमानकाळाचा व भविष्यकाळाचाही आहे.
प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : १६०
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)